"भारत हा शेती प्रधान देश आहे हे सर्वांना माहित असेलच. पावसाळा आला कि सर्वजन शेतीच्या कामाला सुरवात करतात. महाराष्ट्रात विधर्भ भागात जवळ जवळ सर्वच लोक शेतीवर अवलंबून आहेत. आपणास कंटाळवाणी वाटणारा पाउस तर त्यांना देवासारखाच आहे. शेतीची कामे करताना जी मेहनत ते लोक घेतात ती क्वचितच कोणाला जमेल. जर कोणाला ती मेहनत अनुभवायची असेल तर त्यांनी आवर्जुन पावसात गावी जावे आणि शेती कामाचा आनंद घ्यावा. काहींना शेती काम करण्याची आवड असते, ते लोक खास पावसात सुट्टी काढून गावी जातात आणि शेती कामाची मज्जा अनुभवतात. महाराष्ट्रात सहसा शेतीची आधुनिक यंत्रे कमी वापरली जातात. विविद्ध प्रकारची शेती आणि त्यातील कामे आणि अनुभव आपण पुढे पाहुया."
""""महाराष्ट्रातील शेतीची क्षेत्रफळे""""
""""महाराष्ट्रातील पीके""""
ज्वारीची शेती
ज्वारी हे महाराष्ट्रात सर्वात महत्वाच पीक आहे. घाटावरील लोकांच्या जेवानामध्ये ज्वारीची भाकरी हा महत्वाचा पदार्थ आहे. देशामध्ये सर्वात अधिक ज्वारीचे पीक महाराष्ट्रात घेतले जाते. भारत देशात जेवढया क्षेत्रफळामध्ये ज्वारीची शेती केली जाते त्याच्या अर्धी जागा महाराष्ट्रात ज्वारीची शेती करण्यासाठी वापरली जाते. हे पीक जळगाव, बुलढाना, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि औंगाबाद या ठिकाणी जास्त करून घेतली जातात.
तांदळाची शेती
ज्वारीनंतर तांदुळ हे महाराष्ट्रात महत्वाच पीक आहे. महाराष्ट्रात जास्त करून जेवनामध्ये भात असतो आणि याची मागणीही खुप आहे. पच्छिम महाराष्ट्रात जास्त करून तांदळाची लागवड केली जाते. तांदळासाठी लागणारी काळी माती महाराष्ट्रात जास्त आहे. तांदळासाठी असणारी सुपिक जमीन जास्त आहे. आज याच पिकाच्या व्यवसायात कित्येक जन श्रीमंत झाले आहेत.गव्हाची शेती
गव्हाची गरज महाराष्ट्रात असतेच. महाराष्ट्रातील आहारात चपाती हा एक पदार्थ असतोच. उत्तर महाराष्ट्रात जास्त करून गव्हाची लागवड केली जाते. तिकडे गव्हासाठी लागणारे हवामान अनुकूल आहे. एकून देशातील उत्पदानाच्या १.५१ % महाराष्ट्रात गव्हाचे उत्पादन केले जाते. नागपुर, अकोला, अमरावती, औरंगाबाद आणि अहमदनगर या ठिकाणी जास्त करून गव्हाची शेती कली जाते.
कापसाची शेती
कापुस हे पीक आवश्यक आहे, त्याशिवाय कापड बनणार नाही. तस हल्लीच्या काळात कृत्रिम कापड बनतात, पण कापसापासून बनलेल्या कापडापासून बनवलेले कपडे शरीरासाठी चांगले असतात. इशान्य महाराष्ट्रात कापसाची लागवड जास्त करून केली जाते. देशातील एकून उत्पदनापैकी सर्वात अधिक उत्पादन महाराष्ट्रात होते. दरवर्षी कापसाचे उत्पादन केले जाते आणि त्याचा दर सरकार ठरवते. कापसाचे उत्पादन अकोला, यवतमाळ, नागपुर, अमरावती, वाशिम आणि वर्धा या ठिकाणी जास्त करुण करून केली जाते.





No comments:
Post a Comment